इतिहास हा केवळ भूतकाळात घडलेल्या घटनांची नोंद नसतो तर त्यातून एकमेकांशी जोडल्या गेलेल्या अनेक घटनांची उकल होत असते.
म्हणून इतिहास हा भूतकाळात घडलेल्या अनेक घटनांचा परस्पर संबंध दर्शवणारा एक दुवा देखील असतो.
पण सध्याच्या काळात इतिहासाचा अभ्यास फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्याकरता अनेक जन करत असल्याने इतिहासातील घटनांचा स्वतःच्या स्वर्थपुर्तीएवढाच आढावा घेतला जातो.
असो.
शिवरायांच्या अनेक पराक्रमांपैकी पन्हाळ्याचा वेढा फोडणे हा एक न विसरता येणारा पराक्रम आहे. त्यावर साज चढवला तो बाजीप्रभू देशपांड्यांच्या स्वामी निष्ठेने. पण आपन कधी विचार करतो का कि, शिवराय नेमके विशाळगडाकडेच का गेले??? बरेच जन म्हणतात कि, विशाळगड पन्हाळ्यापासून जवळ असल्याने शिवराय विशाळगडाकडे गेले. पण समजा नंतर सिद्धी जोहरने विशाळगडालाच वेढा दिला असता तर??? पण तसे झाले का?? तर नाही. विशाळगडाला सिद्धी जोहरने वेढा दिल्याचा उल्लेख इतिहास करत नाही. कारण सिद्दी जोहरच काय पण औरंगजेब सुद्धा विशाळगड सह्जासहजी जिंकू शकला नाही. असा हा विशाळगड अजिंक्य होता म्हणुन शिवाजी महाराज विशाळगडाकडे गेले हे एक कारण आहेच. पन त्यापेक्षाही आणखी एक महत्वाचे कारण होते ते म्हणजे विशाळगडाचा इतिहास.
शिवरायांच्या अनेक पराक्रमांपैकी पन्हाळ्याचा वेढा फोडणे हा एक न विसरता येणारा पराक्रम आहे. त्यावर साज चढवला तो बाजीप्रभू देशपांड्यांच्या स्वामी निष्ठेने. पण आपन कधी विचार करतो का कि, शिवराय नेमके विशाळगडाकडेच का गेले??? बरेच जन म्हणतात कि, विशाळगड पन्हाळ्यापासून जवळ असल्याने शिवराय विशाळगडाकडे गेले. पण समजा नंतर सिद्धी जोहरने विशाळगडालाच वेढा दिला असता तर??? पण तसे झाले का?? तर नाही. विशाळगडाला सिद्धी जोहरने वेढा दिल्याचा उल्लेख इतिहास करत नाही. कारण सिद्दी जोहरच काय पण औरंगजेब सुद्धा विशाळगड सह्जासहजी जिंकू शकला नाही. असा हा विशाळगड अजिंक्य होता म्हणुन शिवाजी महाराज विशाळगडाकडे गेले हे एक कारण आहेच. पन त्यापेक्षाही आणखी एक महत्वाचे कारण होते ते म्हणजे विशाळगडाचा इतिहास.
बहमनी सुलतान अल्लाउद्दिन अहमदशहा इ.स.वी. सन १४३५ साली गादीवर आला. अहमदशहा
याने १ सप्टेंबर १४३६ रोजी मुख्य वजीर दिलावर खान याला संगमेश्वरच्या मोहिमेवर पाठवले.
सरखा म्हणजे रायरीचा अधिपती शिर्के यांच्याशी थोड्याफार चकमकी आणि वाटाघाटी
नंतर दिलावर खानाने मोहिम आटोपती घेतली. त्याने त्याबदल्यात रायरीच्या
शीर्के व जावळीच्या मो-यांकडुन अगणित संपत्ती व संगमेश्वर अधिपतीची
कन्या ( मो-यांची औरस किंवा अनौरस कन्या
) घेतली. ही अगणित संपत्ती व
मो-यांची कन्या त्याने अल्लाउद्दीन अहमदशहा याला
अर्पण केली. मो-यांच्या त्या कन्येशी सुलतानाने
विवाह केला व तिचे नाव ‘जेब-चेहरा’असे ठेवले. तीचे नाव परी चेहरा असेही होते.
अल्लाउद्दिन अहमद्शहा याचा याआधी एक विवाह खानदेशच्या
फारुखी घराण्यातील मलीक नासीरखान याची कन्या ‘आगा=जैनब’ हिच्याशी इसवी. सन १४२९
साली झाला होता. संगमेश्वरच्या मो-यांची
कन्या अल्लाउद्दिन अहमदशहाच्या महालात आल्यावर आगा जैनब हिने आपल्या बापाकडे म्हणजे
मलिक नासीर खानाकडे अल्लाउद्दिन अहमदशहाविरुद्ध तक्रार केली. मुलीची तक्रार ऐकुन नासीरखानाने आपल्या जावयाच्या राज्यावर आक्रमन केले.
हे कळताच अहमदशहाने आपल सरदार मलिक उत तुज्जार याला प्रतिकारार्थ पाठवले.
मलिक उत तुज्जार याने नासीर खानाचा पराभव करुन ७० हत्ती व अगणित संपत्ती
लळिंग या नासीरखानाच्या राज्यातुन हस्तगत केली. या सर्व घटना
फेरिश्ता या फारसी इतिहासकाराने त्याच्या बुरहाने मसीर या ग्रंथात नोंदवुन ठेवल्या
आहेत.
फेरिश्ताच्या कथनानुसार दिलावर खानाची कोकणातील मोहिम
जरी यशस्वी झाली असली तरी त्या प्रांतातल्या कटकटी संपल्या नव्हत्या. सन १४४७ मध्ये “खलफ हसन मलीक उत तुज्जार” याला कोकणच्या मोहीमेवर अल्लाउद्दिन बहमनीने रवाना केले. त्याने चाकण येथे आपली छावनी केली होती. तो चाकण येथुन
मावळांत शिरुन कोकणात उतरला. कोकणाच्या किनारपट्टीवर संकिसर
( संगमेश्वर अर्थात किल्ले खेळणा) त्याने जिंकुन
घेण्याचा मनसुबा केला. कोकणच्या किनारपट्टीवरील संकिसरचा किल्ला
अतिशय मजबुत समजला जाई. किल्ल्याच्या आजुबाजुला घनदाट वने व असंख्या
अस्या खिंडी होत्या. किल्ल्याच्या आश्रयाने अनेक काफर हिंदु राहत
असत. ते किल्ल्याची मजबुती आणि परीसरातील भौगोलिक परिस्थिती आणि
वातावरण यांचा फायदा घेवुन जलमार्गाने व खुश्किच्या मार्गाने प्रवास
करणा-या मुस्लिम यात्रेकरुना लुटत असत,
ह्या मोहिमेचे वर्णन करताना फेरुश्ता म्हणतो –
“ हा ( किल्ले खेळणा) किल्ला जिंकुन
घेण्याच्या उद्देशाने मलिक उत तुज्जार याने कोकणची स्वारी केली. कोकणात उतरल्यावर वाटेतील “शिर्के”नावाच्या काफराच्या ताब्यातील किल्ल्याला त्याने वेढा दिला आणि
तो किल्ला त्याने जिंकुन घेतला.” (शिर्क्यांच्या ताब्यातील
हा किल्ला म्हणजे किल्ले रायरी व शिवकाळातील शिवरायांची राजधानी दुर्गराज रायगड.
) फेरिश्ता पुढे लिहितो कि, “ त्या (शिवी) शिर्क्याला त्याने
कैद केले. त्याला खलफ हसनने सांगीतले कि, एक तर मुसलमानी धर्माचा स्विकार तरी कर नाहीतर तुला ठार मारने मला भाग पडेल.
ह्यावर त्या लबाड काफराने मोठ्या नम्रतेचा आव आणुन मलिक उत तुज्जार ह्याला
सांगीले कि, माझ्यामध्ये आणि किल्ले खेळण्याच्या शंकरराय मोरे
ह्याच्यामध्ये वंशपरंपरागत वैर आहे. शंकररायाच्या अमलाखाली किल्ले
खेळण्याचा आसमंत आहे. मी जर इस्लाम धर्म स्विकारला आणि माझा शत्रु
शंकरराय हा हिंदु राहुन आपली सत्ता उपभोगत राहीला, तर तुम्ही
ह्या प्रदेशातुन माघारी गेल्यावर धर्मांतराच्या कारणावरुन शंकरराय माझी ह्या भागात
तिरस्कारपुर्वक अवहेलना करील आणि माझे बिरादरीचे लोक आणि माझी प्रजा कदाचीत बंडास प्रवृत्त
होईल. ह्याचा परीणाम असा होईल कि माझ्या वाडवडिलांपासुन ताब्यात
असलेला प्रदेश माझ्या हातातुन जाईल. आत्ता मी मुसलमान धर्म स्विकारण्याची
कबुली आपणास दिलेलीच आहे. म्हणुन ह्यापुढे ह्या प्रदेशात हिंदुधर्मियांचे
संरक्षण करने आणि मुर्तीपुजकांची मिजास चालु देणे म्हणजे मला अपमानास्पद आहे.
म्हणुन माझा प्रतीस्पर्धी शंकरराय ह्याला आपन प्रथम वठणीवर आणा आणि त्याच्या
ताब्यातील प्रदेश माझ्या अधिका-यांच्या स्वाधीन करा. माझ्या सहाय्याने हि गोष्ट तुम्हाला साध्य करने तुम्हाला कठीण नाही.
आपन जर असे केलेत तर ख-या धर्माच्या तत्वांचा मी
स्विकार केला आहे असे मी जाहीर करेन. सुलतानांच्या सेवकांमध्ये
मीही सामील होइन. सुलतानाच्या खजिन्यात प्रतीवर्षी मी खंडनी भरेन.
ह्या भुभागातील जे वतनदार सुलतानाशी बेइमानीने वागतील त्यांना मी वठनीवर
आणीन. मी सुलतानाचा निष्ठावंत पाईक होईन.
ह्यावर मलीक उत तुज्जारने शंकीत होऊन विचारले कि, माझ्या असे कानावर
असे आले आहे कि, शंकररायाच्या खेळण्याचा मार्ग घनडाट जंगलाचा
आहे. ह्यावर शिर्के म्हणाला कि, मी ह्या
भागाचा माहीतगार आहे, मी ह्या घनदाट अरण्यातुन सुगम मार्ग दाखवण्यासाठी
सातत्याने आघाडीवर राहीन. माझ्यासारखा कर्तबगार आणि विश्वासु
असताना मार्ग शोधण्यासाठी येणा=या अडचनी आणि जंगलात एकमेकांची
होणारी चुकामुक आणि त्यामुळे होणारे हाल आपल्या वाट्यास येणार नाहीत. तुमच्या फौजेला मी अस्या मार्गाने खेळण्याच्या पायथ्यासी घेऊन जाईन कि तुम्हाला
कोणत्याही प्रकारचा उपद्रव होणार नाही. आणि विनासायास खेळणा किल्ला
जिंकण्याची तुमची मनीषा आपोआप पुर्ण होईल.
मलिक उत तुज्जार ह्याला शिर्के ह्याच्या कौटिल्यनीतीची
सुतराम कल्पना आली नाही. त्याचा उत्साह आणि निष्टावानपना ह्याची मलिक उत तुज्जारने प्रशंसा
केली, शिर्के ह्याच्या वचनावर विसंबुन मलिक उत तुज्जारने हिजरी
८५७ ( सन १४५३) मध्ये खेळण्याची मोहीम हाती
घेतली.
फेरिश्ता पुढे लिहितो कि, “ त्या (शिवी) काफराच्या गोड बोलण्यावर खलफ हसन फसला. त्याने आपल्या
हरोळीच्या पथकाबरोबर मार्गदर्शक म्हणुन शिर्के ह्यांना घेतले आणि संगमेश्वर किल्ल्याच्या
रोखाने मार्ग आक्रमन करण्यास सुरुवात केली. खलफ हसनच्या फौजी
अधिक-यांनी ह्या घनदाट अरण्यातील मार्गाने शाही फौजेने जाण्याचा
धोका खलफ हसनच्या नजरेस आणुन दिला. विजयोन्माद चढलेल्या खलफ हसनने
त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष्य केले. त्याला दैवानेच त्याला
तो निर्णय घेऊ दिला होता. शिर्के ह्याच्या गोड बोलण्याने भारावलेल्या
खलफ हसनच्या हातुन फौजेच्या बंदोबस्तास आवश्यक असणा-या गोष्ठिंत
चुका घडु लागल्या. त्याच्या फौजी सल्लागारांनी दिलेल्या सल्ल्यांचा
त्याच्या मनावर काहीही परिणाम होत नव्ह्ता. अखेर त्या
(शिवी) आणि काळतोंड्या काफराने त्यांना अस्या मार्गावर
आणले की जेथे सह्यगीरीचा भयंकर उभा चढ आणि जीव धास्तावनणारा उतार ह्याखेरीज पुढे जाण्यास पर्याय
नव्हता. (हा बहुदा कशेडी घाट असावा.) रस्ता तर इतका कठीन होता कि,
आसमंतातील मराठ्यांशिवाय त्या मार्गावर प्रत्यक्ष सैतानाचीही दैन्यावस्था
झाली असती. लसेबसे मार्ग आक्रमीत ते एका ठिकाणी येऊन पोहोचले.
त्या भुभागाभोवताली गगणाल गवसणी घालणा-या उत्तुन्ग
पर्वतरांगानी आपली मस्तकरुपी शिखरे उंचावली होती. तर दुस-या बाजुस पृथ्वीचा भेद करणा-या पातळाचा वेध घेणा-या असुर्यपश्या अस्या अतिशय खोल द-या होत्या.
( हा बहुदा श्रीक्षेत्र परशुराम घाटाचा परीसर असावा.) त्या डोंगरधारा आणि त्यांचा उतार
घनदाट व्रुक्षवेलींनी अच्छादलेला होता. घनदाट वृक्षांच्या बुंध्यातुन
आणि त्यांना वेढणा-या वेलींच्या जाळ्यामुळे मार्ग काढने कठीण
जात होते. त्या जागेच्या एका बाजुला तो प्प्रवेश वेढुन टाकणारी
खाडी होती. ( ही वशिष्टी नदीची खाडी असावी.) अस्या भयानक जागी जवळ जवळ ते तीस चाळीस हजार पायदळ व घोडदळ युद्धाच्या तयारीने
जमा झाले होते. ह्या परीस्थीतीत आणखी एक दुर्घटना घडली.
खल्फ हसन याला रक्ताची हगवन लागली. त्याला जडलेल्या
या असाध्य आजारांमुळे त्याला पुढे कुच करता येईना. प्रकृती अस्वास्थ्यामुळे
सैन्यास तो हुकुम देन्यास व सैन्यात शिस्त राखण्यास असमर्थ ठरला. सैन्यातले लोक दिवसभर प्रवास करुन थकुन विसावा घेण्यास जागा मिळेल तेथे पडत.
कारण जवळ जवळ तंबु ठोकता येतील अशी मोकळी जागा तेथे सापडत नव्हती.
ह्याप्रमाणे थकुन भागुन मुसलमानी फौज विश्रांती घेत पडले असता.................
एक दिवसी विश्वासघातकी शिर्का शंकररायाकडे गेला. ( हा शंकरराय म्हणजे
संगमेश्वरचा अधिपती किल्ले खेळण्याचा मौर्य कुलोत्पन्न शंकरराय मोरे.) कोकणावर आक्रमन करण्यास आलेल्या सर्व बहमनी फौजेस मी असहाय्य गलितगात्र अवस्थेत
तुझ्या जबड्यात आणुन सोडले आहे. शंकरराय मोठी फौज घेऊन निघाला.
आपणावर एकाएकी कोणीकडुन हल्ला होईल ह्याची बहमनी फौजेस बिलकुल धास्ती
नव्हती.
सा-या दिवसाच्या श्रमाने ते श्रांत होते.
अस्या ह्या पराधीन व दुर्बल अवस्थेत खेळण्याच्या शंकरराय मोरे ह्याच्या
फौजेने तुंबळ रण माजवुन सात हजार मुसलमान सैन्य कापुन काढले. त्यावेळी जोराचा वारा सुटलेला असल्यामुळे मुसलमानी सैन्याच्या किंकाळ्यादेखिल
एकमेकांस ऐकु आल्या नाहीत. मदीना, करबला,
नजफ येथील मोठमोठ्या पाचशे सय्यदांसह खुद्द मलिक उत तुज्जार ह्या लढाईत
मारला गेला. त्याबरोबर जे दक्षीनी व हबसी कामगार आपल्या दोन हजार
लोकासह बरोबर होते त्यांची देखिल हीच अवस्था झाली. उजाडण्यापुर्वीच
त्या रनयज्ञात शेवटची आहुती देऊन त्या अरण्यातुन शंकरराय मोरे आपल्या लोकांसह वर्तमान
माघारे किल्ले खेळण्यावर निघोन गेला.
हे झाले फेरीश्ता याचे निवेदन. सन १५७० ते १६११
ह्या अवधीत निजामशहा व आदिलशहाच्या पदरी होता. सबब या वर्णनात
अतिशयोक्ती व आरोप निश्चितच मराठ्यांच्या विरोधात आहेत. इतर इतिहासकार
व फेरिश्ता याच्या निवेदनात एक मुलभुत फरक असा कि, इतर इतिहासकार
सांगतात कि किल्ले खेळण्याच्या पायथ्यासी झालेल्या या युद्धात रायरीचा शंकरराय शिर्के
यांचाही हात होता. खेळण्याच्या शंकरराय मोरे यांनी मलिक उत तुजारची
आघाडी कापुन काढली तर रायरीच्या शंकरराय शिर्के यांनी शत्रुसैन्याची पिछाडी मारली.
परकीय आक्रमकांच्या विरोधात दोन मराठा घराण्यांनी एकत्र येऊन दिलेला
हा लढा हिंदु इतिहासात एकमेवाद्वितीयच. काही मुस्लिमधार्जीण्या
इतिहासकारांच्या मते किल्ले खेळण्याच्या पायथ्याचा हा रणसंग्राम म्हणजे विश्वासघात
आहे. त्यांना जे वाटेल ते वाटो, आम्हाला
किल्ले खेळण्याच्या आसमंतात झालेल्या या “दुस-या” धर्मयुद्धाचा वक्ष भरुन अभिमान आहे. हो दुसरे धर्मयुद्ध!! कारण याच किल्ले खेळण्यावर द्वापार
युगात श्रीकृष्णाने मौर्य कुलोत्पन्न मुचकुंद ऋषींच्या हातुन परकिय आक्रमक कालयवन ठार
मारला होता. आणि त्याच मुचकुंद ऋषींचा वंशज असलेल्या खेळण्याच्या
शंकरराय मो-यानी यवन असलेल्या मलिक उत तुजारची आहुती रणयज्ञात
दिली.
खलफ हसन मलिक उत तुज्जार याचा गनिमी काव्याच्या सहाय्याने
धुव्वा उडवणा-या किल्ले खेळण्याच्या शंकरराय मोरे आणि किल्ले रायरीच्या शंकरराय शिर्के यांना
आमचा मानाचा मुजरा.
क्रमशः
( आधार – किल्ले विशाळगड
– कथा त्रयोदसी. लेखक – ज्येष्ट
इतिहास संकलक श्री. आप्पा परब.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा